पोस्ट्स

रफी साहब, आपने मराठी को कितने खूबसूरत चांद , दिये मान गये !

इमेज
दोनच दिवसांपूर्वीची गोष्ट आहे.काही कामानिमित्त पीसीएमसी ते स्वारगेट मेट्रोने प्रवास करत होतो. वेळ दुपारची असल्याने फारशी गर्दी नव्हती. माझ्या शेजारीच एक सत्तरीचे आजोबा प्रवास करत होते. आजोबानी मेट्रोच्या संगीताच्या नियमाला बगल देत हेडफोन न वापरता, मोबाईलवर गाणी लावली होती. त्यामुळे त्या गाण्याच्या आस्वाद मला देखील घेता आला. आजोबानी शोधिसी मानव लावुनी अंतरी,  प्रभू तू दयाळू कृपावंत  दाता, हा छंद जीवाला लावी पिसे, हा रुसवा सोड सखे, हे मना आज कोणी बघ तुला या सारखी गाणी आपल्या मोबाईलवर लावली होती  आजोबांची गाणी शांत संगीताची आणि सहज गुणगुणता येतील या प्रकारच्या मराठी भाषेतील असल्याने मी आजोबांना गाणी आवडल्याचे सांगितलेत्यावर त्यांनी स्मितहास्य देत,ही  सगळी गाणी पंजाबी मुसलमान असलेल्या मोहंमद रफी यांनी गायलेली आणि श्रध्येय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे  भाऊ श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेली आहेत अशी माहिती पुरवली. त्यांना शिवाजीनगर येथे जायचे असल्याने ते उतरून गेले मात्र  त्यांनी एका नव्या वादळाला जन्म दिला . हे वादळ होते मराठीला किती समृद्ध वारसा आह...

दिव्यांगांविषयीच्या आपल्या जाणिवा वाढवणारा चित्रपट 'कोशीश

इमेज
चित्रपट हे समाज प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे. हे माध्यम जर खुबीने वापरले तर फार मोठा संदेश सहजतेने देता येतो. इतर ‌वेळी काय कटकट आहे, असे म्हणून संदेश  देणाऱ्याचे नावे बोट मोडण्याची वेळ  येण्याची शक्यता १०० टक्के आहे असे सदेश देखील समाजात मोठ्या प्रमाणात देण्याची ताकद या माध्यमात आहे.ती देखील अरे आपल्याला संदेश देण्यात आला आहे,याची विशेष वेगळी जाणीव न होता. मात्र इतकी प्रभावी ताकद असून देखील या माध्यमाचा सकारात्मकतेने वापर केले गेल्याची उदाहरणे फारच तूरळक आहेत‌. या तूरळक उदाहरणामध्ये नाव घ्यावेच लागेल असा चित्रपट म्हणजे कोशीश. १९७२ साली प्रदर्शित झालेला अत्यंत संवेदनशील आणि आशयघन हिंदी चित्रपट म्हणून कोशीश ओळखला जातो. त्याचे दिग्दर्शक गुलझार आहेत. या चित्रपटात जया बच्चन आणि संजीवकुमार यांनी साकरलेली  मूक-बधिर दांपत्याची भूमिका आपणास विचार करायला भागच पडते ‘कोशीश’ची कथा हरिचरण आणि आरती या दोघांच्या आयुष्याभोवती फिरते. बोलता व ऐकता न येणाऱ्या दोन व्यक्ती समाजात आपले स्थान निर्माण करण्यासाठी कशी झुंज देतात, याचे हृदयस्पर्शी चित्रण या चित्रपटात आहे. संव...

कर्तृत्व सिद्ध करायला सांगणारे गाणे, 'आकाशी झेप घेरे पाखरा'

इमेज
  दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे वेळ साधारणत: रात्रीच्या नऊच्या आसपसाची. पुणे शहरातील मंडई या भागातून दत्तवाडीतून जाण्यासाठी बस मध्ये प्रवास करत होतो. बस मध्ये एक सत्तर वर्षाचे आजोबा सुद्धा प्रवास करत होते माझ्याबरोबर. आजोबांनी त्यांच्या मोबाईलवर गाणी लावली होती  अर्थात आजोबांचे वय बघता त्यांनी हेडफोन न लावता स्पीकरवर  फोन ठेवत गाणे सुरू केले होते त्यामुळे ते गाणे मला पण ऐकू आले गाण्याचे बोल होते 'आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याच्या पिंजरा' . माझा प्रवास दहा मिनीटात संपला. मात्र  अत्यंत व्यापक अर्थ आणि सुंदर गेयता असलेल्या  या गाण्यामुळे सुरु झालेली माझी विचार प्रक्रिया अजून सुरूच आहे.  १९७६ साली आलेल्या 'आराम हराम है', या मराठी चित्रपटातील हे गाणे. चित्रपटाचे नाव जरी हिंदी वाटत असले तरी चित्रपट मराठी आहे तो देखील १९७६ साली ही गोष्ट विशेष आहे. सुमारे दोन वर्षापुर्वी मराठी चित्रपटांची नावे विनाकारण इंग्रजीत ठेवली जातात,असी टिका केली जात होती.त्या पार्श्वभुमीवर आजपासून ५० वर्षापूर्वी हिंदीशी साध्यर्म साधणारे नाव मराठी चित्रपटाला देणे एक वेगळेच...

संवादाची नवी परीभाषा उलगडणारा चित्रपट 'पुष्पक'

इमेज
  मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे.मनुष्याला दुसऱ्या व्यक्तीशी संवाद साधायला आवडते. संवाद साधायला मनुष्य त्याला निसर्गाकडून मिळालेल्या अनोख्या अस्या स्वरयंत्रातून विविध आवाज काढतो. या आवाजातून भाषा तयार होते आणि मनुष्य या भाषेच्याद्वारे संवाद साधतो,असे समाजशास्त्रज्ञ नेहमी सांगतात. मात्र भाषाद्वारेच संवाद साधता येतो का, की भाषेशिवाय देखील अन्य संवादाची माध्यमे आहेत याचा अभ्यास करता समोर येणारे चित्र मोठे मनोरंजक आहे‌, आणि या मनोरंजक विश्वाची ओळख होते,ती बॉलिवूडमधील एक उत्तम अभिनेते असलेल्या कमल हसन यांनी १९८७ साली भुमिका केलेल्या 'पुष्पक' या चित्रपटामुळे. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते सिंगीतम् श्रीनिवास राव, तर सिंगीतम् श्रीनिवास राव आणि श्रृंगार नागराज या दोघांनी मिळून त्याची निर्मिती केली होती. कमल हसन यांनी हिरोची तर हिरोईनच्या भुमिकेछ अमला अक्किनेनी होत्या. अन्य प्रमुख कलाकारांचा विचार करता रमेश, फरीदा जलाल, प्रताप पोतन, लोकनाथ, पी. एल. नारायण, रम्या  आदींनी यात भुमिका केल्या होत्या   बंगळूरूमध्ये चित्रीत झालेल्या या चित्रपटात एक देखील स...

पुरुषांसाठी महिला किती आवश्यक आहे, हे स्पष्ट करणारे गाणे, 'इसलिये लडकिया, लडकोंसे...

इमेज
आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक उत्तमोत्तम गाणी आहेत. काही गाणी त्याला दिलेल्या संगीतामुळे उत्तम या प्रकारात मोडतात. काही गाणी ती ज्या पार्श्वभुमीवर चित्रीत झालेली आहेत, त्यामुळे काही गाणी छान वाटतात. तर काही गाणी त्यातून देण्यात आलेल्या संदेशामुळे सर्वोत्तम श्रेणीत मोडतात.या सर्वोत्तम श्रेणीत मोडणारे एक गाणे म्हणजे, २००४ मे मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम तूम' या चित्रपटातील एक गाणे‌. पुरुषांच्या आयुष्यातील महिलांचे महत्त्व अधोरेखित करणारे 'इसलिये लडकीया लडकोंसे नही होती,हे गाणे. जतीन -ललित या सुप्रसिद्ध जोडीने संगीतबद्ध केलेले आणि अलका यागनिक- शान यांनी आवाज दिलेले हे गाणे, चित्रीत झाले आहे, राणी मुखर्जी आणि सैफ अली खान वर. अभिनयाच्या क्षेत्रात महत्त्वाचा मानल्या गेलेल्या आवाजात दोष असून देखील त्यावर मात करत एकेकाळी बॉलिवूडमध्ये स्वत: चे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून राखी मुखर्जी ओळखल्या जातात. त्यावर स्वतंत्र्यपणे लिहता येऊ शकते, मात्र तूर्तास इतकेच. सहा मिनीटे इतक्या मोठ्या कालावधीचे गाणे परदेशात चित्रीत झाले आहे‌. सुरवातीला सैफ महिला किती त्रासदायक आहेत‌. महिला प...

एक नजर त्यांचा कामावर

इमेज
मी काही महिन्यापुर्वी छावा हा चित्रपट  बघितला. चित्रपटातून आपणास अनेक अज्ञात बाबी समजतात.त्याबद्दल चित्रपट निर्मात्या रवी कौशीकचे मानावे तितके आभार कमीच आहे. त्याच्यामुळे मराठ्यांचा ज्वाजल इतिहास समस्त देशवासीयांच्या समोर आला.या चित्रपटाविषयी अनेकांनी भरभरुन लिहल्याने त्याविषयी मी काही जास्त बोलणार नाही.तितकी माझी पात्रता देखील नाही मला तूमचे लक्ष वेधून घेण्याचे आहे.कोणताही चित्रपट संपल्यावर चित्रपट निर्मितीच्या विविध टप्प्यावर गुंतलेल्या व्यक्तींची जी यादी येते त्याकडे            माझे असे निरीक्षण आहे की बहूसंख्य जण चिञपट संपल्यावर येणाऱ्या श्रेयावलीकडे साफ दूर्लक्ष करतात चिञपट तयार करणे हे सांघीक कार्य आहे आपल्यास पडद्यावर जितके लोक दिसतात त्याचा तुलनेत अधिक लोक पडद्यामागे कार्यरत असतात त्याचा कामाची दखल घेण्यासाठी चिञपटाची सांगता झाल्यावर दाखवण्यात येणारी श्रेयावली किमानपक्षी डोळ्याखालून घालणे आवश्यक आहे असे माझे प्रामाणीक मत आहे                   त्यातील काही जणांना विविध पुर...

कोण बघतो कश्यासाठी चित्रपट

इमेज
कोण मेले कोणासाठी रक्त ओकुन ? " या पक्तींचे एक अजरामर मराठी  गाणे आहे त्याच धर्तीवर कोण बघतो कशासाठी चिञपट ?असे म्हणावे अशा किशा  नुकताच माझ्या मिञांचा कट्ट्यावर घडला    तर त्याचे असे झाले की कट्ट्यावर खुप दिवसात चिञपट बघीतला नसल्याने सर्व जण मिळून चिञपटाला जाण्याचे ठरले मग कोणता चिञपट बघायला जायचे यावर चर्चा सुरु झाली माझ्या एका मिञाने थोडा गंभीर विषयावर असणाऱ्या चिञपटाला जावू असे सुचवले यावर दुसरऱ्या एका मिञाने आपण आधीच समस्येने ञासलो असताना परत टेशंन वाढवणाऱ्या गोष्टी का करायचा अशा मुद्दा मांडला त्यापेक्षा गमतीदार विषयाचा चिञपट बघण्याला प्राधान्य देणे महत्ववाचे असल्याचे सांगीतले तुम्हाला काय वाटते ?  धर्तीवर    चिञपट कोणत्या कारणासाठी बघायचे फक्त निव्वळ करमणूकीसाठी की ज्ञानवर्धक करमणूकीसाठी ? या माध्यमाचा समाजावर प्रचंड प्रमाणात परीणाम होतो आणि या माध्यमावर बाजारपेठेचा प्रचंड प्रभाव असतो जी आपण कोणते चिञपट बघतो यावर अवलूंबन असते              फक्त निव्वळ करमणुक महत्ववाची की ज्ञानवर्धक करमणूक ...