पोस्ट्स

मे, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आयुष्यातली आणि भारतातील राजकारणाची वस्तुस्थिती मांडणारे ३ 'स'

इमेज
आयुष्यातली आणि भारतातील वस्तुस्थिती मांडणारे ३ 'स' हे शीर्षक वाचून गोंधळात पडला ना ? हे कसले शीर्षक ?/ ' 'स' या मुळाक्षराचा आणि आयुष्यातील आणि भारतातील वस्तुस्थितीचा काय तो संबंध ? बरे असेल काही संबंध मात्र त्यात ३ या आकड्याच्या संबंध तो काय ? असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनात  हे शीर्षक बघून आले असतील तर सांगतो मी या लेखात बोलणार आहे तीन मराठी चित्रपटांविषयी. या तिन्ही चित्रपटांच्या सुरुवातीचे अक्षर आहे 'स' . या तिन्ही चित्रपटांमधून काय संदेश  देण्यात आला आहे.याचा विचार करता त्यातील एक चित्रपट आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो अगदी चांगल्या गोष्टीच्या आहारी गेले तरी आयुष्याची मातीच होते हे सांगतो. तर राहिलेले दोन चित्रपट राजकारणी आणि सार्सामान्य जनता आणि राजकारणी व्यक्तींमधील एकमेंकांवर कुरघोडी कोणत्या पद्धतीने करतात यावर भाष्य करतात  तसे बघायला गेले  तर या चित्रपटात सांगण्यात आलेले संदेश अनेक चित्रपटातून देण्यात आलेले आहेत या तिन्ही चित्रपटांच्या नावाची सुरुवात जशी 'स' या अक्षरापासून होते तसेच साम्य देखील या चित्रपटांतून आपण दिसू शकते तर...